Friday, 29 November 2019, 07:15 am( 2 weeks )
वातावरणातील बदलाचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. भाजी मंडईत कांद्याचा भाव 35 ते 60 रुपये प्रति किलो असा होता. मात्र आता 90 रुपयांचा आकडा कांद्याच्या दरांनी गाठला आहे. लवकरच ते 100 रुपये प्रति किलो होणार आहे. ग्राहकांना आशा आहे की, अफगाणिस्तानमधून लवकरच कांदा चांगल्या क्वालिटीचा येईल.
मात्र खराब क्वालिटीच्या कांद्यामुळे व्यापारी हा कांदा विकत घेत नाहीत. ऑनियन ट्रेडर्स असोसिएशनचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितल्यानुसार, नाशिक, गुजरात, कर्नाटकमध्ये खराब हवामानामुळे कांदा दिल्लीत पोहोचला नाही. फक्त राजस्थानच्या अलवरहून दिल्लीत कांदा पोहचत आहे. दररोज चार ते पाच हजार टन कांदा दिल्लीत पोहोचत आहे. अफगाणिस्तानमधून 140 टन कांदा आला असून 35 रुपये दराने आहे. मात्र याचा दर्जा अतिशय खराब आहे.